मंत्री नितेश राणेंचा घणाघात; हिंदू समाजाला सावधान राहण्याचे आवाहन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Amir Khan) याच्या तिसऱ्या लग्नावरून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आमिर खानने आपली प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी या विवाहावरून आमिर खानवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. आमिर खानला ‘लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसेडर’ असे संबोधत नितेश राणे यांनी समस्त हिंदू समाजाला या प्रकारांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा पद्धतीच्या नटांना मोठे करायचे की नाही याचा गांभीर्याने विचार करून, हिंदू तरुणांनी आमिर खानच्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार टाकावा की काय, अशी स्थिती असल्याचे राणे म्हणाले.
https://prahaar.in/2026/07/13/foreign-trip-go-on-these-8-amazing-foreign-trips-at-a-low-cost-a-golden-opportunity-to-travel-abroad-on-a-budget/
शिर्डी(Shirdi) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या समाजात घडतात, तेव्हा या पद्धतीच्या लोकांकडे ‘लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणूनच पाहावे लागते. त्यामुळे मी माझ्या समस्त हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की, तुम्ही या बाबतीत कमालीचे सतर्क आणि सावधान राहिले पाहिजे. असे ब्रँड अॅम्बेसेडर जिथे कुठे दिसतील, तिथे त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार झाला पाहिजे.”
https://prahaar.in/2026/07/13/horrific-wife-shot-dead-on-her-birthday-accused-police-constable-absconding/
नितेश राणे पुढे म्हणाले की, जेव्हा मोठे सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजाने त्यावर सखोल विचार करणे गरजेचे आहे. आमिर खान हा अशा कृत्यांतून लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडरच बनत चालला आहे. जे हिंदू तरुण त्याचे चित्रपट आवर्जून पाहतात, त्यांनी अशा नटांना डोक्यावर घेण्यापूर्वी आणि मोठे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जे लोक अशा व्यक्तींना आपले आदर्श किंवा सेलिब्रिटी मानतात, त्यांनी आपली मानसिकता तपासण्याची खरी गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
https://prahaar.in/2026/07/13/property-transactions-worth-a-staggering-%e2%82%b917543-crore-in-the-2025-26-financial-year/
अभिनेता आमिर खानने गौरी स्प्रॅट हिच्याशी केलेले हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचे दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा काडीमोड (घटस्फोट) झाला आहे. आमिरला त्याच्या आधीच्या दोन लग्नांपासून तीन मुले आहेत, तर गौरीला तिच्या पहिल्या विवाहापासून एक मुलगा आहे.