Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

0
Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा (Rain) जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण (Konkan) विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm), वादळी वाऱ्यांसह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/25/strait-of-hormuz-30-indian-ships-have-passed-through-the-strait-of-hormuz-the-vessels-are-carrying-oil-gas-and-fertilizers-with-over-20-more-ships-in-the-queue/

पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाड्यात (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सर्व संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha) अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/25/it-is-mandatory-for-private-hospitals-to-display-rate-cards-for-treatments/

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here