केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास मंदावला असून राज्यभर पावसासाठी नागरिकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या बदलत्या प्रवाहामुळे मुंबई आणि पुण्यातील पावसाचे आगमन लांबले आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
मान्सूनचा प्रवास का मंदावला?
हवामानातील बदल आणि वायव्येकडील अस्थिर वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. तरीही पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मान्सूनचा विस्तार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. १२ ते १८ जूनदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सोलापूरपर्यंत मोसमी वारे पोहोचल्यामुळे लवकरच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागातही मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
https://prahaar.in/2026/06/13/big-accident-in-assam-indian-air-force-an-32-transport-plane-crashes-catches-fire-at-jorhat-airbase/
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट :
एकीकडे पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ तसेच लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. खानदेशातही कोरडे हवामान आणि कडक उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)
https://prahaar.in/2026/06/13/pakistan-will-not-get-even-a-single-drop-of-water-defence-minister-rajnath-singhs-stern-warning-regarding-the-indus-waters-treaty/