मुंबई : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. (Palghar Accident)
घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित प्रशासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत. (Palghar Accident)
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यास तातडीने मंजुरी दिली. या प्रकरणी मृतांच्या वारसांची पडताळणी करून मंजूर मदत तातडीने वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश देण्यात आले आहेत. (Palghar Accident)
अपघातात मृतांची नावे :
– रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष :
अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत वाटपाची प्रक्रिया जलद केली आहे. तसेच इतर आवश्यक प्रशासकीय कामेही प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. (Palghar Accident)