लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभा जागा कमी होणार असल्याच्या आरोपांना ठामपणे फेटाळले. तसेच जातीय जनगणना आणि परिसीमन या मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
या विषयावर काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रा यांच्या भाषणानंतर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये. त्यांनी सांगितले की, तीन विधेयकांमुळे दक्षिणेकडील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होईल, असा एक चुकीचा कथन (नॅरेटिव्ह) तयार केला जात आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे.
https://prahaar.in/2026/04/17/heat-wave-warning-in-13-states-appeal-to-take-care/
Modi government assures that delimitation will benefit Southern states and not harm them. Do listen… pic.twitter.com/2CpWZ6DrD6
— Amit Shah (@AmitShah) April 16, 2026
लोकशाही धोक्यात असल्याच्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की भारतातील लोकशाही कोणाच्याही ताकदीने संपवता येणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत (इमरजन्सी) प्रयत्न झाला होता, पण जनता टिकून राहिली आणि लोकशाहीही कायम राहिल्याचे शाह यांनी सांगितले.