नवी दिल्ली: पहिल्यावहिल्या खोखो वर्ल्डकपच्या(Kho Kho World cup 2025) पहिल्याच सामन्यात यजमान भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात नेपाळला ४२-३७ असे हरवले.
भारताने नेपाळविरुद्ध सुरूवातीला टॉस जिंकतच विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी अटॅकची बाजू घेतली. यावेळेस भारताने पहिल्या टर्नमध्ये २४ पॉईंट मिळवले. त्यानंतर भारताने नेपाळला २० पॉईंट्सवर रोखले.
https://prahaar.in/2025/01/13/india-gears-up-for-kho-kho-world-cup-2025-in-new-delhi/
त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने पुन्हा आक्रमण करताना २२ गुण मिळवले. त्यामुळे भारताची आघाडी वाढली. त्यानंतर नेपाळचे आक्रमण थोपवताना त्यांना ३७ गुणांवर रोखत आपला पहिला सामना जिंकला.