Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांकडून मातोश्रीची हफ्तेवसूली!

रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांकडून मातोश्रीची हफ्तेवसूली!

गृहमंत्री आणि मणिपूर हिंसाचारावर लिहिण्यापेक्षा आधी मुंबईतील हिंदू बांधवांकडे लक्ष द्या

आमदार नितेश राणे यांनी केला प्रश्नांचा भडीमार

मुंबई : मुंबईतील रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांकडे आधार कार्ड आणि वोटर कार्ड असून त्यांना वीज-पाणी कोण देते? वर्षानुवर्षे मुंबईवर सत्ता कोणाची आहे? का त्यांच्याविरोधात सामनामधून कधी अग्रलेख लिहिला जात नाही? बेहरामपाडा आणि भारतनगरमध्ये ते एका एका खोलीत ३०-४० जण रहातात. या मुंबईतील रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांकडून मातोश्रीला हफ्ते पोहचवले जातात, याची माहिती तुम्ही देणार आहात? असा प्रश्नांचा भडीमार भाजप आमदार नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

देशाच्या गृहमंत्री आणि मणिपूर हिंसाचारावर लिहिण्यापेक्षा आधी मुंबईतील हिंदू बांधव मुंबई सोडून जात आहेत, त्याकडे आधी लक्ष द्या, त्यावर काहीतरी लिहा, असा टोमणाही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

हे हिंदू विरोधी सगळे प्रकार पाहून आज शिवसेनाप्रमूख बाळासाहेब हयात असते तर त्यांनी आधी संजय राऊतच्या ढूंगणावर लाथ मारून हाकलून दिले असते, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -