मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Share

मुंबई : मुंबईत २ जानेवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाईदेखील असणार आहे. तसेच २ जानेवारीपर्यंत शहरात शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

पोलिसांनी २ जानेवारीपर्यंत मुंबई शहरात कलम १४४ लागू केले आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पोलीस सतर्क

मुंबईत कलम १४४ लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे. मुंबई शहरात शांतता राहावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी ४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत शहरात कलम १४४ लागू केले आहे.

यादरम्यान एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ४ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत शहरात शस्त्रे, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर यावेळी घोषणाबाजी, निदर्शने आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घातली आहे. तसेच लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास मनाई असेल. सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या सभा घेण्यास मनाई नाही. सरकारी कार्यालये, न्यायालये आणि सरकारी किंवा निमशासकीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आसपास ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.

Recent Posts

Rohit Sharma: आयुष्यात आधीही ही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

2 hours ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

2 hours ago

Nitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू नयेत!

आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…

3 hours ago

अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…

4 hours ago

पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…

4 hours ago

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…

4 hours ago