मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. तसेच अधिवेशनात काय मुद्दे मांडणार हेही त्यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबक प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचे आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर विचार करू, असे सांगण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
एकंदरीतच अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला असून भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना मदत झाली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आण बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…
चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…
पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या…
'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…
जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…
मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने…