नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या (COngress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. काँग्रेसचा चेहरा मानला जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. तर आता दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली ( Arvinder Singh Lovely resigns) यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अरविंदर सिंग लवली यांनी आपला राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात होता, त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले.
अरविंदर सिंग लवली यांनी स्वतःला दिल्ली पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी काँग्रसचे आभार व्यक्त केले. तर पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा यासाठी गेल्या ७-८ महिन्यांत दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, असे अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये जेव्हा आपल्याकडे कार्यभार सोपवण्यात आला तेव्हा पक्षाच्या युनिटची स्थिती सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून विविध उपाययोजना करून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साही करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले आहे. तसेच, पक्ष सोडून गेलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना पक्षात पुन्हा सामील करून घेतले, असेही अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
पुढील चार दिवस 'असं' असेल वातावरण, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान…
लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी हजारो चाहते गोळा झाले आणि... नेमकं काय घडलं? हैदराबाद : दाक्षिणात्यच नव्हे…
उत्तर प्रदेश : एकीकडे कडकडत्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अशा बदलत्या…
मुंबई: जीवनात यश मिळवण्यासाठी लोक हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात मात्र इतके करूनही यश मिळत नाही.…
मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स…
मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे…