मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या रेल्वेसेवा सुरू केल्या. सोबतच रेल्वे स्थानकेही मॉडर्न होण्याच्या मार्गावर आहे.
आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनचे(vande bharat train) मेट्रो व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, याला वंदे भारत मेट्रो असे नाव दिले गेले आहे. ही ट्रेन लहान प्रवासासाठी फायदेशीर असेल. भारतीय रेल्वे वंदे भारत मेट्रोच्या ट्रायल रनला जुलैपासून सुरूवात केली जाणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्राथमिकता वंदे भारत मेट्रो आहे. यात १२ कोच असतील. या ट्रेनला वेगाने चालण्याच्या हिशेबाने डिझाईन करण्यात आले आहे. यात चार कोच, आठ कोच आण १६ कोच असलेले मॉडेलही चालवले जाऊ शकतील. अधिक गर्दी असलेल्या मार्गावर १६ कोचची वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाईल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन फायदेशीर आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या मते ही वंदे मेट्रो ट्रेन १०० ते २५० किमी दूरपर्यंत चालवली जाईल. पहिल्या टप्प्यात १२४ शहरांना वंदे मेट्रो एकमेकांना जोडेल. यात काही मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यात लखनऊ-कानपूर, आगरा-मथुरा आणि तिरूपती-चेन्नई यांचा समावेश आहे.
लेखी परीक्षाही द्यावी लागणार नाही; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी होत आहे भरती? मुंबई : सध्या…
काय आहे प्रकरण? मुंबई : सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलची (IPL) हवा आहे. कोणता संघ बाजी मारणार…
राजीनामा देत सांगितले 'हे' कारण शेकडो कार्यकर्त्यांसह आज केला भाजपामध्ये प्रवेश धुळे : निवडणुकीच्या रणधुमाळीत…
बीसीसीआय मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये (Cricket) पहिली बॉलिंग किंवा बॅटिंग कोण…
पावसाची सर, ढोलकीचे सूर, पारंपारिक संगीत अशा भक्तीमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध डेहराडून : हिंदू धर्मात…
केवळ १९ वर्षीय तरुणी करत होती हा प्रकार छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मातृत्वाचा सन्मान करणारा…