नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Rashtravadi Congress Party) पाच महिन्यांपूर्वी फूट पडली तेव्हा अनेक आमदारांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ दिली तर काहीजण शरद पवारांच्या (Sharad Pawar) साथीला राहिले. या संपूर्ण उलथापालथीत राष्ट्रवादीचे विश्वासू नवाब मलिक (Nawab Malik) मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ते बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना आपल्याला पाठिंबा द्यावा याकरता गळ घातली होती. मात्र, नवाब मलिकांची भूमिका अनेक दिवस स्पष्ट होत नव्हती.
ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र नवाब मलिकांनी यावर स्पष्टता दिली नव्हती.
आज नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यामध्ये नवाब मलिक सत्ताधार्यांच्या जागी शेवटच्या बाकावर बसलेले दिसले. म्हणजेच अखेर मलिकांनी अजितदादांच्या गटाला पाठिंबा दिला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…