Nagpur winter session : नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Share

पुढचे दहा दिवस राजकीय उलथापालथींचे…

नागपूर : महाराष्ट्रात गेले काही दिवस राज्याचे वातावरण तापवणार्‍या अनेक घटना घडल्या आहेत. मराठा आरक्षण हा त्यातील पेटलेला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय अवकाळी पाऊस, शेतकर्‍यांचं नुकसान, वाढलेली गुन्हेगारी, ड्रग्ज कारवाया आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची वेळ आली आहे. आजपासून नागपुरात (Nagpur) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात विरोधकांकडून प्राधान्याने शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकारकडे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. तसेच आरोग्य विभागातील असुविधा, ड्रग्ज कारखाने व त्यांवरील कारवाया यासंबंधी विरोधक प्रश्न उपस्थित करु शकतात. या प्रश्नांना सत्ताधारी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

कसं असेल पहिल्या दिवसाचं कामकाज?

सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील –
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश २०२३ (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२३ ( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक २०२३(गृहनिर्माण विभाग)
सन २०२३-२४ च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील – शासकीय कामकाज
त्यानंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल.

Recent Posts

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

45 mins ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

2 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

3 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

4 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

5 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

5 hours ago