Categories: क्रीडा

लखनऊ-बंगळूरुमध्ये आरपारची टक्कर

Share

कोलकाता (वृत्तसंस्था) : बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर लीग साखळीतील टप्पा पूर्ण केला. एलिमिनेटर खेळणाऱ्या दोन संघांपैकी एकाचा प्रवास या सामन्यातील पराभवाने संपणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात आरपारची टक्कर अनुभवण्यास मिळू शकते.

या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. याआधी साखळी टप्प्यात दोन्ही संघांत सामना पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये बंगळूरुने लखनऊचा दणदणीत पराभव केला होता. पण आता प्लेऑफच्या मोठ्या टप्प्यावर स्पर्धेचे दडपण वेगळेच असणार आहे, दोन्ही संघ आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

आयपीएल २०२२ ची सुरुवात लखनऊ सुपर जायंट्ससाठी खास नव्हती. संघाला पहिल्याच सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने वेग पकडला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये लखनऊला टेबल टॉपर बनण्याची विशेष संधी होती. मात्र, शेवटच्या ३ सामन्यांपैकी २ गमावून त्याने ही संधी गमावली.

कोलकाताविरुद्ध लखनऊने साखळी टप्प्यातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यात केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च सलामी भागीदारी करत २१० धावा केल्या होत्या. पण हे लक्ष्य वाचवण्यात संघाच्या गोलंदाजांची तारांबळ उडाली, अखेरीस एविन लुईसच्या अप्रतिम झेलने लखनऊच्या पारड्यात हा सामना गेला. अशा स्थितीत एलिमिनेटरमध्ये संघाच्या गोलंदाजांवर विजयाची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे, आयपीएल सुरू होण्यापूर्वी चॅलेंजर्सचा टॉप-४ चा संघ म्हणून कोणीही विचार केला नव्हता. पण संघातील अनकॅप्ड खेळाडूंनी ज्या प्रकारे आपला खेळ उंचावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे, तो पूर्णपणे वाखाणण्याजोगा आहे. यामध्ये रजत पाटीदार आणि शाहबाज अहमद हे सर्वात मोठे सकारात्मक मुद्दे समोर आले आहेत. त्यांच्यासोबतच अनुभवी दिनेश कार्तिकनेही आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांना चकित केले आहे.

शेवटच्या सामन्यापूर्वी या संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत होती. बंगळूरुसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे शेवटच्या साखळी सामन्यात विराटने शानदार ७३ धावा केल्या. शिवाय या सामन्यात फाफ

डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता एलिमिनेटर सामन्यात बंगळूरुच्या विजयासाठी या तिन्ही खेळाडूंचे चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच या मोसमातील आतापर्यंतच्या दोन्ही संघांच्या कामगिरीनुसार केएल राहुलचे पारडे जड असल्याचे दिसते. कारण, या मोसमात लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानी गेलेल्या राजस्थानपेक्षा अधिक संतुलित दिसत आहे.

ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता वेळ : रात्री ७.३० वाजता

Recent Posts

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

28 mins ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

1 hour ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

1 hour ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

2 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

2 hours ago

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…

2 hours ago