दादा आमचा बोलताना
शब्दाला जोडतो शब्द
त्या जोडशब्दातून मग
भेटतो नवीन शब्द
बडबडणाऱ्याला म्हणतो
बोलू नका अघळपघळ
काटकसरीने वागा जगा
करू नका उधळमाधळ
अभ्यास करूनी परीक्षेत
दाखवावी अक्कलहुशारी
मस्करीची होते कुसकरी
कशास हवी थट्टामस्करी
मित्र असावा साथीला
लाभावी संगतसोबत
गप्पांची भरावी शाळा
उलगडावी गंमत जंमत
लहानथोर साऱ्यांचीच
विचारावी ख्याली-खुशाली
सबब सांगून कुठलीही
करू नये ढकला ढकली
दादा म्हणतो शब्दांचा
असा साधावा ताळमेळ
फुलत जाते भाषा तेव्हा
पाहू नये काळवेळ…!
१) खरमरीत बोलण्यासाठी
कोणाला सतत टोचतात?
नाकबूल होण्यासाठी
कशावर हात ठेवतात?
पटकन विश्वास ठेवणारा
कशाने असतो हलका?
नाव त्याचं सांगा
लवकर तुम्ही बरं का?
२) हा असेल ओला
तर मित्र लागे भला
याच्या काकणाला म्हणे
आरसा कशाला
हा जिथे फिरे
तिथे लक्ष्मीही फिरे
कुणाबद्दल बोलतात त्याचे
नाव सांगा खरे?
३) सत्य कळले
की हे उघडतात
बेशुद्ध पडले की
हे पांढरे होतात
आश्चर्यचकित होताच
हे विस्फारतात
खोटेनाटे सांगून
धूळ कोठे फेकतात?
१) कान
२) हात
३) डोळे
RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…
महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…
मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…
मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…
मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…
नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…