कर्जत (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील विज वितरण कंपनीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. उष्मा वाढत असल्याने विजेची मागणीदेखील जोर धरू लागली आहे. परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून सायंकाळी ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो.
लख्ख विजेचा प्रकाश आणि जोरदार ढगांचा कडकडाट आणि पावसामुळे कर्जत तालुक्यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत. काल सायंकाळी झालेल्या वादळी व विजेच्या कडकडाटासह पावसामुळे कळंबोली येथून कर्जतसाठी येणाऱ्या मुख्य विज वाहिनीवर झाड पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला झाला. तर नाना मास्तर नगर ते माळवाडी रोड जवळ विज वितरण वाहिन्यांवर झाडे पडल्याने वाहक ताराचे नुकसान झाले. यामुळे सांयकाळीपासून रात्रीपर्यंत विज प्रवाह खंडित झाला होता मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या देखरेखीखाली कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करून विज पुरवठा पूर्ववत केला.
लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…
संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…
देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…
डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political…