जव्हार :पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर संतप्त झालेल्या जव्हार भाजपने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध केला आहे.
यावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय जनजाती सदस्य हरिश्चंद्र भोये, बाबाजी कोटोळे, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले, डॉ. हेमंत सवरा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर,शहरअध्यक्ष नागेश उदावंत, चेतन पारेख, सुधाकर गावित, उमेश नायकर, विलास चव्हाण,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावाही करण्यात येत आहे.
रक्कम इतकी मोठी की नोटा मोजणाच्या मशीन्स मागवल्या मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात…
मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…