Murder : ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी भारतीय व्यक्ती जेरबंद

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी (murder) भारतीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजविंदर सिंग असे या व्यक्तीचे नाव असून २०१८ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये एका महिलेची हत्या केली होती. त्यानंतर तो भारतात पळून आला होता.

राजविंदरने टोयाह कॉर्डिंग्ले नामक महिलेची हत्या केली होती. हत्येच्या २ दिवसांनंतर तो पत्नी-मुलांसह नोकरी सोडून पळून गेला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१८ मध्ये २४ वर्षीय टोयाह कॉर्डिंग्ले ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर आपल्या श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा तिची हत्या करण्यात आली होती.

क्वींसलँड पोलिसांनी गेल्या महिन्यात राजविंदरची माहिती देणाऱ्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. हे क्वींसलँड पोलिसांनी आतापर्यंत ठेवलेले सर्वात मोठे बक्षीस होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टोयाहची हत्या केल्यानंतर राजविंदर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतात पळून गेल्याचे आम्हाला ठावूक होते.

२३ ऑक्टोबर रोजी तो सिडनीहून भारताच्या दिशेने निघाला होता. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०२१ मध्ये भारताकडे राजविंदर सिंग याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला यंदा नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी गेल्या महिन्यात पंजाबी व हिंदी अवगत असणारे ऑस्ट्रेलियन पोलीस भारतात आले होते.

Recent Posts

Robot Wedding : अजब गजब! तरुण चक्क रोबोटसोबत बांधणार लग्नगाठ

जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…

30 mins ago

बॉयफ्रेंडच्या एका सल्ल्याने तरुणीचे उजळले नशीब; बनली लखपती

चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…

1 hour ago

Arvinder Singh Lovely : काँग्रेसला आणखी मोठा धक्का! दिल्ली प्रदेशाध्यक्षाचा पक्षाला रामराम

पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या…

2 hours ago

Mumbai University Exams: लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…

3 hours ago

farmer scheme : शेतकऱ्यांना ‘या’ तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…

4 hours ago

Vande Bharat Metro: आता येत आहे वंदे भारत मेट्रो, रेल्वेने ट्रायल रनची तयारी केली सुरू

मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने…

5 hours ago