नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. भारताच्या सीमाभागात चीनकडून हालचाली वाढल्यामुळे भारतीय लष्कर चीनी लष्कराच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
चीनच्या सीमालगत चीनी सैन्याने गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. तसेच सैन्याच्या विविध तुकड्यांचा सरावदेखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीन पुन्हा भारतावर संर्घष करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडूनही चीनविरोधात कारवाईची तयारी करण्यात आली असल्याची माहिती, कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.
चीन लष्कर, वायूदलात सैन्यांची वाढ करत बऱ्याच काळापासून सीमाभागात तुकड्यांचा सराव करत आहेत. तसेच चीनकडून गस्तींचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडने पूर्ण तयारी केली असून संर्घषाला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे कमांडर पांडे म्हणाले.
भारतीय लष्करानेही नियंत्रण रेषेजवळ गस्ती वाढवल्या आहेत. तसेच भारताकडे हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे सैन्यबळही उपलब्ध आहे. गस्तीसाठी सर्वेलन्स ड्रोन्सचा वापर करण्यात आला असून अत्याधुनिक रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि नाईट विझिबिलिटीसाठीची सामग्री भारताकडे उपलब्ध आहे, असे कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.
मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली…
मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…
Godrej Family Split: गोदरेज कुटुंबाने 30 एप्रिल रोजी 127 वर्ष जुन्या कंपनीला दोन संस्थांमध्ये विभाजित…
मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी…
CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…