मुंबई : ठाकरे सरकारच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सरकारवर केला आहे. राज्यातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणींशी करार न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे ते म्हणाले.
कोळसा खरेदी न करणे आणि त्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे हे ठाकरे सरकारचे मोठे अपयश असून हा प्रकार दुर्दैवी आहे. तसेच सरकारच्या निष्क्रियतेमुळे माजरी परिसरातील नागलोन येथील डब्ल्यूसीएलचे दोन प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरातील चिंचोली कोळसा खाणी प्रलंबित असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.
डब्ल्यूसीएलसोबत योग्य वेळी कोळशाचा करार केला असता तर राज्यातील कोळसा संकट टाळता आले असते. महाराष्ट्र सरकार राज्यातील कोळसा उत्पादक खाणींशी करार न करता महागडा कोळसा आयात करत असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…