पुणे : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी,आम्ही केली की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली असून, दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आज फोडाफोडीच्या राजकारणावरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्यासोबत काय घडले, त्याबाबत संजयभैय्या बोलले आहे. वसंतदादा शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नेतृत्वात सरकारचे कामकाज सुरू होते. मात्र, ते सरकार पाडले गेले. मग जनता पक्षाला घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचेही ऐकले नाही, असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी मुंबईला पोहोचेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. मी म्हटले हे कसं काय झाले, तर मला म्हणाले ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे यांनी केले की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी, मी केले की वाटोळे, असे विधान अजित पवार यांनी केले .
बेदम मारहाण...कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि... नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक…
जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…