लाहोर (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चूक सुधारत टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. आधीच्या जर्सीवर यूएईऐवजी लिहिले होते भारत असे लिहिले होते. यंदाचा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात होत नसला, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोरोना महामारीमुळे, बीसीसीआय आणि आयसीसीने परस्पर संमतीनंतर हे ठिकाण ओमान आणि यूएईला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे. मात्र आता पाकिस्तानने भारताच्या नावासोबत वर्ल्डकपसाठी नवी जर्सी लाँच केली आहे.
पाकिस्तान संघ भारतासह दुसऱ्या गटामध्ये आहे. या गटात भारताशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ देखील सहभागी आहेत. भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने आहेत. पाकिस्तानने २००९ मध्ये टी-ट्वेन्टी विश्वचषक ट्रॉफी जिंकली, तर २००७ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
विश्वचषकापूर्वीही दोन्ही देशांचे चाहते आणि क्रिकेटपंडित हे सोशल मीडियावर वादविवाद करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) त्यांच्या वर्ल्डकप जर्सीबाबत केलेल्या एका गोष्टींमुळे चर्चेत आला होता. व्हायरल झालेल्या जर्सीच्या फोटोंमध्ये पाकिस्तानने भारताऐवजी यूएईचे नाव लिहिले होते.
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…
मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…
९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…