Google layoffs : गुगलचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

Share

‘या’ योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे होत आहेत हाल

मुंबई : गुगल दरवेळी नवे नवे अपडेट देण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. कमी खर्च करण्याच्या योजनेमुळे गुगलने गेल्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तर आता गुगल पुन्हा त्याच्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याचे समोर आले आहे. गुगलने रिअल इस्टेट आणि फायनान्स विभागातील कर्मचारी कमी केल्याचा अहवाल आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने युनायटेड स्टेटबाहेरील कमी पगारात काम करणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत. खर्च कमी करण्याच्या गुगलच्या या योजनेमुळे संपूर्ण टीमला कामावरून कमी करण्यात आले आहे. याचा परिणाम कंपनीतील पायथन विभागातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. तर आता गुगल कंपनीने म्युनिक, जर्मनी येथे कमी पगारात काम करणारी एक नवी टीम स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ही कर्मचारी कपात केली असल्याची शक्यता आहे असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

गुगलच्या वित्त प्रमुख रुथ पोराट यांनी कर्मचाऱ्यांना असे सांगितले आहे की, ही कंपनी बंगळुरू, मेक्सिको सिटी आणि डब्लिनवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंपनीच्या पुर्नरचनेचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली आहे.

तसेच आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या त्यांचा खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नोकऱ्या कमी करत आहेत. याच कारणामुळे गुगलशिवाय ॲमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Recent Posts

IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स…

36 mins ago

Success Mantra: यशाचा सुंदर मार्ग, या ६ सवयींनी बदला आपले नशीब

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग काही सोपा नाही. अशा…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…

4 hours ago

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

7 hours ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

8 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

9 hours ago