मुंबई: गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यातच मुंबईहून शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे.
सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतचा वेग वाढवून लवकरच १३० किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारतचा वेग ८३ किमी प्रति तास इतका आहे. अनेक रेल्वे ट्रॅकची स्थिती इतकी चांगली नाही की वंदे भारत आपल्या १६० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने वंदे भारतचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅकच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा प्रवासातील अर्ध्या तासाचा वेळ वाचेल. यामुळे इगतपुरी-भुसावळ या अन्य रेल्वेंनाही याचा फायदा होईल.
मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २२२२३ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि साईनगर शिर्डी टर्मिनस या दरम्यान चालवली जाते. ही ट्रेन ११.४० मिनिटांनी सीएसटी येथून निघते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी हा प्रवास ५ तास २० मिनिटांचा आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५ स्थानके आहेत. हा प्रवास ३४३ किमीचा आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…