मुंबई: इंडिया आघाडीने (india alliance) मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक आज ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीत सामील असलेले राजकीय पक्षाचे नेते मुंबईत पोहोचतील. संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजता पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर साडेसहा वाजता सर्व नेता अनौपचारिक बैठक करतील. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. याआधी १.१५ वाजता आघाडीचे नेते ग्रुप फोटो सेशन करतील. यानंतर बैठक सुरू होईल. ही बैठक दोन वाजेपर्यंत सुरू राहील. बैठक सुरू होण्याआधी आघाडीचा लोगो जाहीर केला जाईल.
इंडिया आघाडीच्या या मुंबई बैठकीत ५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २६ पक्षांचे साधारण ८० नेते पोहोचण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोहोचण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीच्या या बैठकीत निवडणुकीसाठीची रणनीती, लोगो, जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच किमान समान कार्यक्रम यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…
मुंबई: भारतात सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामाची धूम आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळवण्यात आला…
नवी दिल्ली: सीबीआयने मोठी कारवाई करताना दिल्लीच्या RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने रुग्णालयाच्या…
पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी…
पवई परिसरात व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये हस्तगत मुंबई : देशभरात निवडणुकींची (Loksabha…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप छत्रपती संभाजीनगर : ठाकरे (Thackeray) हे नकली हिंदुत्ववादी आहेत. त्यांना…