नागपूर: अजित पवार यांच्या स्टंटबाजीनंतर आणि शरद पवार यांनी अदानींना दिलेल्या समर्थनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आजही आहेत. गेल्या पाच वर्षात अनेकजण आमच्याकडे आले. संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन निवडणुकीवेळी होतं. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजुनही पोहोचलेले नाही. त्यामुळे तिथेही पोहोचायला मिळाले तर चांगलच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.