मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वी विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत अक्षय कुमार हा अभिनेता शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकला होता. मात्र, या जाहिरातीमुळे अक्षय सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. तसेच त्याचे चाहतेही खूप नाराज झाले होते. अखेर अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.
यासंदर्भात अक्षय कुमार म्हणाला की, मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिले नाही आणि यापुढेही कधी देणार नाही. विमल पान मसालाच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. तसेच या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन, असेही त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, यापुढे भविष्यात मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडेन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी मी इच्छा व्यक्त करतो.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…