Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीविमलच्या जाहिरातीवरून अक्षय कुमारने मागितली माफी

विमलच्या जाहिरातीवरून अक्षय कुमारने मागितली माफी

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वी विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत अक्षय कुमार हा अभिनेता शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकला होता. मात्र, या जाहिरातीमुळे अक्षय सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. तसेच त्याचे चाहतेही खूप नाराज झाले होते. अखेर अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.

यासंदर्भात अक्षय कुमार म्हणाला की, मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिले नाही आणि यापुढेही कधी देणार नाही. विमल पान मसालाच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. तसेच या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन, असेही त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, यापुढे भविष्यात मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडेन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -