मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील धुसर वातावरण (Air pollution) क्षणभर प्रत्येकाला धुक्यांचा भास देऊन जाणारे ठरत आहे. मात्र, हे धुके नव्हे तर धुली कण असल्याने मुंबईच्या हवामानावर ते परिणाम करणारे ठरत आहेत. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून हवेतील स्तर ढासळत असून अद्यापही सुधारणा झालेली नाही. तर सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी धुकेसदृश्य वातावरण दिसून येते मात्र ते धुके नसून धुली कण आहेत. यामुळे सध्या सर्दी खोकला घसा दुखण्याचे प्रमाणही मुंबईत वाढले आहेत.
दरम्यान मुंबईत २९३ एक्यूआय सह हवेचा स्तर ‘वाईट’ नोंदवला गेला आहे. तर मुंबईतील कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसी, अंधेरी भागातील हवेची स्थिती अत्यंत खराब असून या परिसरात ‘अतिशय वाईट’ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.
यात माझगाव येथे हवेचा स्तर सर्वाधिक खराब आहे. येथे ३८१ एक्यूआयची नोंद झाली आहे. त्यानंतर मालाड येथे ३२३, कुलाबा ३०९, बीकेसी ३०९ आणि अंधेरी ३०३ एक्यूआय ची नोंद झाली. सध्या हवेचा स्तर खराब झाल्यामुळे हे सर्व परिसर ‘रेड झोन’ मध्ये आहेत. तर वरळी आणि बोरिवली येथे १९० आणि १७३ हवेचा स्तर नोंदवला असून हा स्तर मध्यम आहे. तर दुसरीकडे मुंबईत सकाळी धुके पसरलेले असतात मात्र हे धुके नाही, तर प्रदूषणामुळे असलेले धुळीचे कण आहेत. यामुळे वातावरण देखील धुसर दिसत आहे.
डिसेंबर महिना आणि थंडी असे एकंदरीत गणित दिसून येते. त्यामुळे धुक्याचा आभास निर्माण करणारे धुलीकण हे मानवी आरोग्यास तसे हानिकारकच आहेत. वातावरणातील हा बदल डोकेदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखी वाढविणारी ठरत आहे.
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…
चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…
पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या…
'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…
जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…
मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने…