नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी सध्या लोकांची मने जिंकत आहे. वाहेनगबाम सुरेया आणि त्यांचे धाकटे बंधू वाहेनगबाम रोहित सिंग अशी या कर्तबगार भावंडांची नावे असून, ते सध्या एअर इंडियामध्ये सहकारी म्हणून ३५,००० फूट उंचीवर एकत्र सेवा बजावत आहेत. या दोन्ही भावंडांमध्ये आठ वर्षांचे वयाचे अंतर आहे. २०१४ मध्ये जेव्हा सुरेया विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कुटुंबातील पहिल्या सदस्या ठरल्या, तेव्हा त्यांच्याच प्रवासातून प्रेरणा घेऊन रोहित यांनीही याच क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले. मोठ्या बहिणीला आदर्श मानत त्यांनी तिच्याच पावलावर पाऊल ठेवत अखेर एअर इंडियात नोकरी पत्करली.
मनोज जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास मुंबई : मराठा समाजाबाबतचे शासन निर्णय (जीआर) योग्य प्रकारे लागू करण्यामध्ये जर कोणी ...
पहाटे लवकर रिपोर्टिंग करण्यापासून ते लांबच्या विमान प्रवासांपर्यंत आणि बदलत्या कामाच्या वेळा सांभाळण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या ते दोघे अगदी उत्तमरीत्या पार पाडतात. विमान प्रवासातील व्यावसायिक वातावरण असले तरी त्यांचे आपुलकीचे नाते आजही कायम आहे. मोठी बहीण सुरेया आजही रोहितने व्यवस्थित जेवण केले आहे की नाही याची आस्थेने काळजी घेते, तर रोहितही ड्युटीच्या मधल्या वेळेत बहिणीची विचारपूस करतो. दिवसभराचे कर्तव्य पार पाडल्यानंतर ते दोघे एकत्रच टॅक्सीने आपल्या घरी परततात.
Long before they shared the skies, they shared a home. With an 8-year age gap between them, Sureiya was always the elder sister he looked up to. Growing up in Manipur, Rohit watched in awe as she became the first in the family to pursue a career in aviation in 2014. He listened… pic.twitter.com/QfZ4thdXbS
— Air India Newsroom (@AirIndia_News) August 28, 2026
एअर इंडियाने त्यांच्या 'एक्स' (ट्विटर) अकाऊंटवर या भावंडांचे काही खास फोटो शेअर करत लिहिले की, "प्रवास तुम्हाला खंडांच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो, पण भाऊ-बहिणीचे नाते नेहमी कायम टिकते." तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी जवळच्या व्यक्तींसोबत असल्याचा आनंद वेगळाच असतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एकाच कुटुंबातील या दोन सदस्यांचा हा अनोखा प्रवास सध्या संपूर्ण देशात कौतुकाचा विषय ठरत असून, तरुणांसाठी तो एक उत्तम आदर्श बनला आहे.






