Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ८४० टन कांदा दिल्लीला पाठविण्यात येत आहे. यासाठी २१ बोगींची मालगाडी लासलगाव रेल्वे मालधक्क्यावर दाखल झाली होती. मात्र, कांद्याची प्रतवारी आणि पॅकिंगचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ही मालगाडी तब्बल १६ तास मालधक्क्यावरच थांबून होती. मंगळवारी सायंकाळी पॅकिंग केलेला कांदा दाखल झाल्यानंतर मालगाडीमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू करण्यात आले. ही मालगाडी बुधवारी दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे. (Nashik News)


दिल्लीपाठोपाठ देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही रेल्वेच्या माध्यमातून कांदा पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीन या शहरांसाठी लासलगाव, निफाड आणि मनमाड येथून कांदा पाठविला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निफाडहून गुवाहाटीकडे जाणारी नियोजित मालगाडी रद्द करण्यात आली असून, इतर शहरांसाठी या आठवड्यात कांदा रवाना होण्याची शक्यता आहे. (Nashik News)



शेतकरी संघटनांचा विरोध


केंद्र सरकारच्या या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून विरोध होत आहे. बफर स्टॉकमधील कांदा देशांतर्गत बाजारात आणण्याऐवजी त्याची निर्यात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात बफर स्टॉकमधील कांदा आणून दर कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

Palghar News : मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप; २२ महिलांविरोधात गुन्हा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा

Nashik News : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :