मुंबई : मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना वेगवेगळ्या प्रकरणांत अटक केली आहे. विशेष म्हणजे, गुन्हा घडला त्यावेळी दोघेही किशोरवयीन किंवा तरुण होते. साकीनाका पोलिसांनी 1986 मधील हत्या प्रकरणात तब्बल चार दशकांपासून फरार असलेल्या 59 वर्षीय आरोपीला अटक केली. तर बोरिवली पोलिसांनी 1990 मध्ये क्रिकेट पंचावर बॅटने हल्ला केल्याच्या आरोपातील आरोपीला 36 वर्षांनंतर पकडले. (Mumbai News)
मुंबई : इंस्टाग्रामवर अमूल लॅक्टोज-फ्री दुधाच्या पॅकेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. त्रिशांग शेट्टी या क्रिएटरने ...
1986 च्या हत्या प्रकरणातील आरोपी अखेर जाळ्यात
साकीनाका पोलिसांनी 20 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथून सुरेश चंदर अडगळे याला अटक केली. 1986 मध्ये एका क्षुल्लक वादातून सहकाऱ्याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी अडगळे 19 वर्षांचा होता. (Mumbai Crime)
अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयीन सुनावणीसाठी हजर राहण्याच्या अटीवर जामीन मिळाला होता. मात्र, त्यानंतर तो न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर त्याने पोलिसांना चकवा देत जवळपास 40 वर्षे आपला ठावठिकाणा बदलला. (Murder Case)
पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. त्याच्या माजी सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांना तो पुण्यात असल्याचा सुगावा लागला. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे रांजणगावमध्ये त्याचे ठिकाण शोधून काढण्यात आले. (Crime News)
पोलिसांनी त्याच्या घरावर सापळा रचून त्याला अटक केली. ओळख लपवण्यासाठी तो कथितरित्या वेगळ्या नावाने राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तो पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
क्रिकेट पंचावर बॅटने हल्ला; 36 वर्षांनी अटक
दुसऱ्या प्रकरणात बोरिवली पोलिसांनी 1990 मधील क्रिकेट पंचावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली 55 वर्षीय ओमप्रकाश ललता पासी याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान बाद दिल्याच्या रागातून त्यावेळी 18 वर्षांच्या असलेल्या पासीने पंचावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान पासी वारंवार गैरहजर राहिल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले. अटक टाळण्यासाठी त्याने पत्ता आणि संपर्क क्रमांक बदलल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला. अखेर ठाण्यातील मीरा रोड पूर्व परिसरातील पूनम रेसिडेन्सीमधून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
दशकांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत या दोन्ही कारवाया करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.