Jalgaon : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ कार, ॲपे रिक्षा आणि दुचाकीची तिहेरी धडक झाली. या अपघातात मध्य प्रदेशातील ४५ वर्षीय राजेश चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. (Jalgaon Accident News)



भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टोयोटा कार भुसावळहून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होती. यावेळी कारने पुढे असलेल्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पुढे जाणाऱ्या ॲपे रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपे रिक्षातील राजेश चव्हाण आणि दुर्गेशकुमार, तसेच दुचाकीवरील समाधान डोळे आणि मनीषा डोळे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी राजेश चव्हाण यांना मृत घोषित केले. (Jalgaon Accident News)



वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू


अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर कार आणि ॲपे रिक्षाचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. याप्रकरणी वरणगाव पोलिसांकडून (Varangaon Police) पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. पोलिसांकडून काही काळापूर्वी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे अर्थात ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (Jalgaon Accident News)



दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू


दुसरीकडे जळगाव शहरातून गेलेल्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, बांभोरी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडलीय. योगेश महाजन (रा. इच्छदेवी चौक परिसर जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर शहरातील वाढत्या अवजड वाहतुकीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टीव्हा वाहनावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने यात योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ टँकरच्या धडकेत भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यात आले नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजारांची ऑफर?

- भाजपकडून व्हिडिओ पुरावा सादर; काँग्रेसचा 'फर्जीवाडा' उघड झाल्याचा दावा मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :