Mumbai-Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण आपघात झाला. या अपघातात कारमधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडीओ महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Mumbai-Goa Highway)


दीव-दमण येथून पर्यटनासाठी गोव्याच्या दिशेने जात असताना इन्सुली येथे चालकाला महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. यामुळे सुसाट कार अचानक खड्ड्यात आदळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. टक्कर इतकी भयंकर होती की, कारमधील एक महिला प्रवासी तब्बल २० फूट उंच उडून थेट रस्त्यावर फेकली गेली. (Mumbai-Goa Highway)


अपघाताची खबर मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापत इतकी गंभीर होती की, उपचारादरम्यानच महिलेचा मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Mumbai-Goa Highway)

Comments
Add Comment

Four-year-old Aarohi :आईपासून दुरावलेली चार वर्षीय आरोही पोलिसांच्या प्रयत्नांनी सुखरूप घरी

लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार

Pratap Sarnaik : व्यवहारिक मराठी न येणाऱ्या १,२६८ चालकांना नोटिस; महिनाभरात मराठी शिका, अन्यथा बॅज निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी

FDA Raid : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित तर १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त!

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने १७ ते २० ऑगस्ट दरम्यान पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली

Mumbai Local : किरकोळ वाद झाला अन् प्रवाशाला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या डब्यातून

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ मुंबई : पावसाळ्यात दोन ते

UBT : धाराशिव जिल्ह्यात 'उबाठा'ला खिंडार

- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का मुंबई : धाराशिव