Wednesday, August 12, 2026

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार

- महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

वडाळा येथून जाणाऱ्या महापालिकेच्या चार प्रमुख जलवाहिन्या आता झोपडपट्यांच्या पुनर्विकास योजनेत अडथळा ठरत येथील सुमारे २ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी येथील सर्व जलवाहिनी काढून बाजुला स्थलांतरीत केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिन्या स्थलांतरीत या संबंधित विकासक स्वखर्चातून करणार आहे. परंतु जिथे जलवाहिनी लगतच्या झोपड्यांना हटवून त्यातील पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केले जात असताना दुसरीकडे जलअभियंता विभागाच्या अखत्यारितील भूखंडावरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी जलवाहिनीची काढून अन्य जागी स्थलांतरीत करण्याची वेळ आली आहे. (BMC News)

मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या पटलावर याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. वडाळा येथील मिठागराच्या जागेवरील पंचशील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने या जागेवर असणाऱ्या सुमारे २२०० झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत लाभ देवून येथील नगर भू क्रमांक ३ भाग या महापालिकेच्या मालकीचा व जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील या भूभागावरील अस्तित्वातील चार मुख्य जलवाहिनी या आय आय टी बॉम्बे या तांत्रिक सल्लागार यांच्या तांत्रिक सूचनेनुसार लगतच्या बाजुला स्थलांतरीत करून उर्वरीत रिक्त होणाऱ्या जागेवर विकासकास झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याकरता महापालिकेची जागा देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्तावाला सुधार समिती व महापालिकेची मंजुरी मागितली आहे. (BMC News)

या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ हे ३६,७१६.८४ चौरस मीटर एवढे आहे. या भूभागावर १२०० मि.मी व्यासाची(जुनी तानसा मुख्य), १२०० मि.मी व्यासाची(नवीन तानसा मुख्य) ८०० मि.मी व्यासाची (विहार मुख्य) १८०० मि.मी व्यासाची( मुंबई दोन) या अस्तित्वातील मुख्य जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अडथळा ठरत असल्याने त्या बाजुच्या जागेवर स्थलांतरीत करून त्याठिकाणच्या झोपडपट्टीचा विकास करण्यात येणार आहे. (BMC News)

कोणत्या जलवाहिनीतून कोणत्या विभागाला होतो पाणी पुरवठा :

-१२०० मि.मी व्यासाची(जुनी तानसा मुख्य), १२०० मि.मी व्यासाची(नवीन तानसा मुख्य) :

जल वाहिनी सकाळी ४ ते १० दरम्यान एम/पश्चिम विभाग येथील टिळक नगर, सहकार नगर, एल विभागातील टिळक नगर टर्मिनल येथील झोपडपट्टी, एफ/दक्षिण येथील शहर दक्षिण क्षेत्र, एफ/उत्तर येथील शहर उत्तर क्षेत्र परिसरात पाणी पुरवठा

-८०० मि.मी व्यासाची (विहार मुख्य): एल विभाग येथील कुर्ला दक्षिण पुर्व क्षेत्रास आणि एम/पश्चिम येथील भक्ती पार्क क्षेत्रास दुपारी ४.३० वाजे पासुन सकाळी २ वाजेपर्यंत पाणी पुरवठा करतात

- १८०० मि.मी व्यासाची( मुंबई दोन) : तेथुन पुण वेळ फॉस मेरी आणि भंडारवाडा जलाशयास व दक्षिण मुंबई शहरास थेट पाणी पुरवठा करण्यात येतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >