आषाढ दीप अमावस्येला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरातील समई, निरंजन आणि इतर दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. घरातील अंधार दूर होऊन सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. (Gatari Amavasya)
Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने ...
श्रावण महिन्याला सुरुवात...
आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावणात अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार टाळून सात्विक आहार घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहार करण्याची परंपरा महाराष्ट्रातील काही भागांत रूढ झाली. मात्र गटारी अमावस्येला मांसाहार करावाच, असा स्पष्ट धार्मिक नियम धर्मग्रंथांमध्ये असल्याचे सांगता येत नाही. ( Ashadh Amavasya)
अमावस्येचा दिवस जप, दान, देवपूजा आणि पितृस्मरणासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार अनेकजण या दिवशी सात्विक आहार घेणे पसंत करतात. मांसाहार करणे किंवा न करणे हा श्रद्धा आणि वैयक्तिक परंपरेचा विषय आहे. ( Solar Eclipse 2026)
सूर्य ग्रहण 'या' भागातून दिसणार...
दरम्यान, 12 ऑगस्टला सूर्यग्रहण होणार असल्याने सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, स्पेनसह युरोपातील काही भागांतून दिसणार आहे. त्यामुळे भारतात या ग्रहणाच्या दृश्यतेचा थेट परिणाम होणार नाही.
भारतामधून ग्रहण दिसत नसल्यामुळे केवळ ग्रहणाच्या नावावरून मांसाहाराबाबत भीती निर्माण करण्याचे कारण नाही. धार्मिक नियम पाळणाऱ्यांनी आपल्या श्रद्धा आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार निर्णय घ्यावा. तसेच सोशल मीडियावरील अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीकडे पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी अधिकृत पंचांग किंवा जाणकारांकडून माहिती घेणे योग्य ठरेल.