Nandurbar : विदारक ! प्रसूतीसाठी गर्भवतीला बांबूच्या झोळीतून पायी नेण्याची वेळ

Nandurbar : नंदुरबारच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना अक्कलकुवा तालुक्यात समोर आली आहे. गावात पक्का रस्ता नाही, मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्कही होत नाही. अशा परिस्थितीत प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी चक्क बांबूची झोळी करून खांद्यावरून पायी रुग्णालयाच्या दिशेने नेलं. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. (Nandurbar News)



नेमकं काय घडलं !


अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील देलबारी, वेहगी परिसरातील बारीपाडा येथील २८ वर्षीय उषा दिनेश तडवी (Usha Dinesh Tadvi) यांना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तात्काळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही. दुसरीकडे, गावाला जाण्यासाठी पक्काच रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. त्यातच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणार तरी कशी ? गावाच्या मध्यातून देवनदी वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. (Nandurbar News)



माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित


अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार केली. आणि झोळीत उषा तडवींना झोपवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यास सुरुवात केली. परंतु, पक्क्या रस्त्यापर्यंत पोहोचण्याआधीच वाटेत महिलेची प्रसूती झाली. यानंतर महिला आणि नवजात बाळाला वेहगीहून पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Pimpalkhuta Primary Health Centre) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्यानंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे (Dr. Ravindra Sonawane) यांनी दिली आहे. (Nandurbar News)


दरम्यान, एकीकडे शासनाकडून दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही एखाद्या गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी बांबूची झोळी आणि ग्रामस्थांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागत असेल, तर विकास नेमका कोणाचा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले ! महावितरण कर्मचाऱ्याची जमावाच्या हल्ल्यात हत्या; अहिल्यानगरमध्ये तणाव, शहर बंद

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहराजवळील मुकुंदनगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर जमावाने

Snakebite In Gadchiroli : गडचिरोलीत सर्पदंशामुळे ३ मुलींचा मृत्यू, ३ मुलींना एअरसिफ्ट करून रुग्णालयात केले दाखल

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानीत आश्रमशाळेत रात्री गाढ झोपलेल्या सहा मुलींना सर्पदंश

Accident News : धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Dhule Solapur Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा

Teacher Recruitment : शिक्षक मेगा भरतीत क्रीडा शिक्षकांची 4,860 पदे वगळली? उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : राज्यात 30 हजार 209 शिक्षक पदांची (Teacher Recruitment) मेगा भरती प्रक्रिया सुरू असतानाच क्रीडा शिक्षकांच्या पदांबाबत

Pimpri-Chinchwad News : बापरे! खेळता खेळता अचानक कुत्र्यांच्या टोळक्याने घेरलं अन् चिमुकलीवर भीषण हल्ला

पिंपरी-चिंचवड : पुणे शहरातील म्हेत्रे वस्तीत मोकाट कुत्र्यांच्या टोळीने 4 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची

Jalgaon : अरे देवा ! चोरट्याने जामनेर आगाराची नवीन बसच पळवली, बस पंक्चर होताच...

Jalgaon : पैसे आणि दागिने चोर पळवतो अशी आपली समजूत असेल तर थांबा ! कारण जळगाव जिल्ह्यात चक्क चोरट्याने बसच पळवली आहे.