Nandurbar : नंदुरबारच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना अक्कलकुवा तालुक्यात समोर आली आहे. गावात पक्का रस्ता नाही, मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्कही होत नाही. अशा परिस्थितीत प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी चक्क बांबूची झोळी करून खांद्यावरून पायी रुग्णालयाच्या दिशेने नेलं. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. (Nandurbar News)
Nashik : नाशिकमध्ये वीज वितरण यंत्रणेतील धोकादायक त्रुटींवर आता नागरिकांना थेट तक्रार करता येणार आहे. महावितरणच्या नाशिक मंडळाने (Mahavitaran's Nashik Circle) यासाठी विशेष ...
नेमकं काय घडलं !
अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील देलबारी, वेहगी परिसरातील बारीपाडा येथील २८ वर्षीय उषा दिनेश तडवी (Usha Dinesh Tadvi) यांना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तात्काळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही. दुसरीकडे, गावाला जाण्यासाठी पक्काच रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. त्यातच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणार तरी कशी ? गावाच्या मध्यातून देवनदी वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. (Nandurbar News)
- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ पूर्व भागातील पश्चिम द्रुतगती ...
माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित
अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार केली. आणि झोळीत उषा तडवींना झोपवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यास सुरुवात केली. परंतु, पक्क्या रस्त्यापर्यंत पोहोचण्याआधीच वाटेत महिलेची प्रसूती झाली. यानंतर महिला आणि नवजात बाळाला वेहगीहून पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Pimpalkhuta Primary Health Centre) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्यानंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे (Dr. Ravindra Sonawane) यांनी दिली आहे. (Nandurbar News)
दरम्यान, एकीकडे शासनाकडून दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही एखाद्या गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी बांबूची झोळी आणि ग्रामस्थांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागत असेल, तर विकास नेमका कोणाचा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.