Navnath Ban : 'गडचिरोलीतील पूल उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच बांधला'; रोहित पवारांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील पूल कोसळल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संबंधित पुलाचा करार २०२० मध्ये आणि बांधकाम २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले असल्याचा दावा करत त्यांनी रोहित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.


भाजप प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, गडचिरोलीतील पूल कोसळल्याप्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर आरोप केले. मात्र, हा पूल महाविकास आघाडीच्या काळातच मंजूर होऊन बांधण्यात आला होता. २०२० मध्ये करार झाला, तर २०२२ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते आणि रोहित पवार हे महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्षाचे आमदार होते.


रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सध्याच्या सरकारला 'दलालांचे आणि कंत्राटदारांचे सरकार' म्हटले असले, तरी या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारवरच येते. त्यामुळे या कामात नेमकी कोणाची जबाबदारी होती, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही बन यांनी केली.



'बाळासाहेबांच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेले' :


शिवसेनेतील वादावर भाष्य करताना नवनाथ बन (Navnath Ban) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेले असून काँग्रेससोबत युती करून त्यांनी मूळ शिवसेनेची वैचारिक दिशा बदलल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत कधीही जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून त्या विचारांपासून फारकत घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेबांच्या विचारांची खरी वारसदार असल्याचे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे."



संजय राऊतांवरही टीका :


संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांचाही नवनाथ बन यांनी समाचार घेतला. "सतत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने करण्यापेक्षा शांत राहणे अधिक योग्य ठरेल. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या वक्तव्यांना कंटाळली आहे," असे ते म्हणाले.



'उबाठा गटाच्या विलिनीकरणाची चर्चा' :


उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या भवितव्यावर भाष्य करताना नवनाथ बन यांनी दावा केला की, उबाठा गट काँग्रेस किंवा समाजवादी पक्षात विलीन होण्याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम असल्याने त्या पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केलेले हे सर्व आरोप आणि दावे हे भाजपची भूमिका असून, यावर संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments
Add Comment

Rajpal Yadav : राजपाल यादव याच्यावर बँकेची मोठी कारवाई; चेक बाऊन्स प्रकरणानंतर आता होणार मालमत्तांचा लिलाव

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Devil Worm : पृथ्वीच्या गर्भातील गुप्त जगाचा चकित करणारा शोध; रहस्यमय 'डेव्हिल वर्म' आणि भूगर्भातील अथांग जीवसृष्टी

तुम्ही जर जमिनीखाली खड्डा खोदून पृथ्वीच्या पोटात उतरू लागलात तर काही वेळातच तुमचा श्वास गुदमरून जीव कासावीस होऊ

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी