मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभरात तब्बल १ हजार रोजगार मेळावे (Maharashtra Rojgar Melava 2026) आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. यावेळी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनासह तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे-इंगळेसह ...
रोजगार मेळावे अधिक व्यापक करण्यावर भर :
मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, रोजगार मेळाव्यांची (Maharashtra Rojgar Melava 2026) माहिती जास्तीत जास्त गरजू युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. केवळ आयटीआय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क साधून या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे.
रोजगारापूर्वी मिळणार कौशल्य प्रशिक्षण :
मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी स्पष्ट केले की, केवळ रोजगार मेळावे घेऊन उपयोग होणार नाही, तर उमेदवारांना पूर्वतयारी आणि कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्यापूर्वी (Maharashtra Rojgar Melava 2026) उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार (एटीकेट), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. तर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Maharashtra Rojgar Melava 2026)
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ...
निवडीचे प्रमाण वाढवण्याचा उद्देश :
योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार मेळाव्यांमधील उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय अधिकारी आणि प्रदेश समन्वय समितीने एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)
दरम्यान, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. समिती सदस्यांनीही रोजगार मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सूचना मांडल्या. (Maharashtra Rojgar Melava 2026)






