गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यातील कटीमारी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) छावणीत सोमवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला हादरा बसला आहे. एका सहायक उपनिरीक्षकाने (ASI) आपल्या सहकारी जवानांवर अचानक गोळीबार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण छावणीत खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. (Assam CRPF Camp)
मिळालेल्या माहितीनुसार, कटीमारी येथील सीआरपीएफ छावणीत तैनात असलेले एएसआय बलानी प्रेमब्रह्म यांनी अचानक त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून सहकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात रामनवल सिंग यादव आणि विष्णू प्रसाद बघेल यांना गंभीर गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Assam CRPF Camp)
पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत घातक असे 'फेव्हीक्विक' ओतून त्याला जिवे ...
सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही झाडली गोळी :
गोळीबारानंतर छावणीत एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर एएसआय बलानी प्रेमब्रह्म यांनी स्वतःवरही गोळी झाडली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत गोविंद श्रीपुल नावाचा आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नागाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Assam CRPF Camp)
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल, तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण छावणीचा परिसर ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, मृत जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Assam CRPF Camp)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१९ पासून आतापर्यंत ३६ देशांतून २७४ फरार आरोपींना भारतात आणले आहे. या आरोपींविरोधात देशात कायदेशीर कारवाई सुरू आहे. ...
गोळीबारामागचे कारण अद्याप अस्पष्ट :
एएसआयने सहकाऱ्यांवर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणा वैयक्तिक वाद, मानसिक तणाव, ड्युटीशी संबंधित मतभेद किंवा इतर कोणतेही कारण या सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येईल. या धक्कादायक घटनेमुळे सीआरपीएफसह देशातील सुरक्षा दलांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, जवानांच्या मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि समुपदेशनाच्या गरजेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Assam CRPF Camp)