Assam CRPF Camp : आसामच्या CRPF छावणीत घडला धक्कादायक प्रकार; एएसआयने सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, ३ जवानांचा मृत्यू, एक गंभीर

गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यातील कटीमारी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) छावणीत सोमवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला हादरा बसला आहे. एका सहायक उपनिरीक्षकाने (ASI) आपल्या सहकारी जवानांवर अचानक गोळीबार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण छावणीत खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. (Assam CRPF Camp)


मिळालेल्या माहितीनुसार, कटीमारी येथील सीआरपीएफ छावणीत तैनात असलेले एएसआय बलानी प्रेमब्रह्म यांनी अचानक त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून सहकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात रामनवल सिंग यादव आणि विष्णू प्रसाद बघेल यांना गंभीर गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Assam CRPF Camp)



सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही झाडली गोळी :


गोळीबारानंतर छावणीत एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, सहकाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर एएसआय बलानी प्रेमब्रह्म यांनी स्वतःवरही गोळी झाडली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत गोविंद श्रीपुल नावाचा आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नागाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Assam CRPF Camp)


घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल, तपास सुरू :


घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण छावणीचा परिसर ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, मृत जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Assam CRPF Camp)



गोळीबारामागचे कारण अद्याप अस्पष्ट :


एएसआयने सहकाऱ्यांवर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणा वैयक्तिक वाद, मानसिक तणाव, ड्युटीशी संबंधित मतभेद किंवा इतर कोणतेही कारण या सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येईल. या धक्कादायक घटनेमुळे सीआरपीएफसह देशातील सुरक्षा दलांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, जवानांच्या मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि समुपदेशनाच्या गरजेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (Assam CRPF Camp)

Comments
Add Comment

Sachin Ahir : मुंबईच्या पुनर्विकासाला मिळणार गती? उपसभापती सचिन अहिर यांची अमित शाहांसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, रेल्वेच्या

Sharad Pawar NCP : शरद पवार गटाकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

इराणमध्ये महागाईचा आगडोंब; रक्त, केस आणि घरातले सामान विकून जगत आहे नागरिक

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता सहा महिने होऊन गेले पण हे यद्ध अजून पूर्णपणे थांबलेले नाही.

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत