Nashik : दारणा धरणाचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दारणा धरणातून (Darna Dam) होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



दारणा धरणातून ९,२८४ क्युसेकने विसर्ग सुरु


नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Irrigation Division) पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आज ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून दारणा धरणातून होणारा विसर्ग ८,०२० क्युसेकवरून वाढवून ९,२८४ क्युसेक करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून, पुढील काळात आवश्यकतेनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.



नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


त्यामुळे दारणा नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात ठेवलेले साहित्य, जनावरे किंवा इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित शासकीय विभागांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी