ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची सुवर्णमोहीम अत्यंत दिमाखात सुरू आहे. शनिवारचा दिवस भारतासाठी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये सुवर्णयशाचा ठरला. महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अत्यंत अतिटीच्या आणि रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताच्या प्रतिभावान बॉक्सर साक्षी चौधरीने यजमान इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा ५-० असा दणदणीत पराभव करून देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.
ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सेसनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. महिलांच्या ७० किलो वजनी गटात भारताची ...
या अंतिम सामन्यात साक्षीने संपूर्ण लढतीत खेळावर आपले वर्चस्व आणि उत्तम नियंत्रण राखले. पहिल्या फेरीत पाचही पंचांनी साक्षीच्या बाजूने निकाल दिला, तर दुसऱ्या फेरीतही तिने ४-१ अशी मजबूत आघाडी घेतली. इंग्लंडच्या रुबी व्हाईटने पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु साक्षीच्या अचूक प्रतिहल्ल्यांनी आणि खंबीर बचावाने तिचे मनसुबे उधळून लावले. तिसऱ्या आणि अंतिम फेरीतही आपले वर्चस्व कायम राखत साक्षीने एकमताने ५-० असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
ग्लासगो: ग्लासगो येथे रंगलेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांची २३ वी आवृत्ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेच्या समारोप समारंभादरम्यान ...
या ऐतिहासिक विजयानंतर साक्षीच्या हरियाणातील भिवानी येथील घरी आनंदाला व उत्साहाला उधाण आले आहे. कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी मिठाई वाटून व ढोल-ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला. साक्षीच्या आई शीला यांनी मुलीच्या या यशावर प्रचंड अभिमान व्यक्त करताना संपूर्ण प्रवासात तिच्या प्रशिक्षकाने दिलेल्या मोलाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी अभूतपूर्व यशाचा झेंडा रोवला आहे. ग्लासगो येथे सुरू असलेल्या या महामुकाबल्यात ...
शनिवारचा दिवस भारतीय बॉक्सिंगसाठी ऐतिहासिक ठरला, कारण या दिवशी देशाने एकापाठोपाठ एक तीन सुवर्णपदके जिंकली. साक्षी चौधरीपूर्वी महिलांच्या ५४ किलो वजनी गटात प्रीती पवारने कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोला ५-० ने हरवून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर, विद्यमान विश्वविजेती जस्मिन लंबोरिया हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात गतविजेती नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा ५-० अशाच समान फरकाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या तिघींच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे.




