Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर



मुंबई : राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खननाला तसेच बेकायदेशीर वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर थेट स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दहापट दंड आकारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६' च्या कलम ४८(७) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास मंजुरी देण्यात आली.  (Illegal Mining)



सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि राज्याच्या दंडात्मक महसुलात वाढ व्हावी, या हेतूने अध्यादेश पारित केला जाणार आहे. दहापट दंडाच्या या तरतुदीमुळे राज्यातील बेकायदेशीर वाळू उपसा आणि खनिज वाहतूक करणाऱ्यांवर मोठा वचक बसेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच, मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित (एमआरव्हिसी) कंपनीचे समभाग भांडवल २५ कोटींवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ( Maharashtra Government)


उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणे आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई रेल्वे विकास महामंडळात केंद्र (रेल्वे मंत्रालय) व राज्य सरकारची अनुक्रमे ५१:४९ टक्के भागीदारी आहे. सध्या महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा विस्तार लक्षात घेता, प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटींवरून ५०० कोटींपर्यंत तर भरणा केलेले समभाग भांडवल २५ कोटींवरून २२५ कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. या भांडवली वाढीसाठी राज्य सरकारच्या हिश्श्याचे ९८ कोटी रुपयांचे योगदान देण्यासही मंत्रिमंडळाने सहमती दर्शवली आहे. (Mining)



कृषी क्षेत्रात 'एआय'साठी उच्चपदस्थ अधिकारी


राज्याने जाहीर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या 'महाअॅग्री-एआय' धोरणाची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रिटेक नाविन्यता केंद्रा'त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) हे स्वतंत्र पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपसचिवांकडे असून, आता हे पद मंत्रालयातील सहसचिव, उपसचिव किंवा समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीद्वारे भरले जाणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.