Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर



मुंबई : राज्यातील वाळू आणि इतर गौण खनिजांच्या अवैध उत्खननाला तसेच बेकायदेशीर वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर थेट स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दहापट दंड आकारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६' च्या कलम ४८(७) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास मंजुरी देण्यात आली.  (Illegal Mining)



सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आणि राज्याच्या दंडात्मक महसुलात वाढ व्हावी, या हेतूने अध्यादेश पारित केला जाणार आहे. दहापट दंडाच्या या तरतुदीमुळे राज्यातील बेकायदेशीर वाळू उपसा आणि खनिज वाहतूक करणाऱ्यांवर मोठा वचक बसेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच, मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित (एमआरव्हिसी) कंपनीचे समभाग भांडवल २५ कोटींवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ( Maharashtra Government)


उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवणे आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई रेल्वे विकास महामंडळात केंद्र (रेल्वे मंत्रालय) व राज्य सरकारची अनुक्रमे ५१:४९ टक्के भागीदारी आहे. सध्या महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा विस्तार लक्षात घेता, प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटींवरून ५०० कोटींपर्यंत तर भरणा केलेले समभाग भांडवल २५ कोटींवरून २२५ कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. या भांडवली वाढीसाठी राज्य सरकारच्या हिश्श्याचे ९८ कोटी रुपयांचे योगदान देण्यासही मंत्रिमंडळाने सहमती दर्शवली आहे. (Mining)



कृषी क्षेत्रात 'एआय'साठी उच्चपदस्थ अधिकारी


राज्याने जाहीर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या 'महाअॅग्री-एआय' धोरणाची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रिटेक नाविन्यता केंद्रा'त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) हे स्वतंत्र पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपसचिवांकडे असून, आता हे पद मंत्रालयातील सहसचिव, उपसचिव किंवा समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीद्वारे भरले जाणार आहे.

Comments
Add Comment

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Nagpur Manish Nagar Accident : नागपूरच्या मनीष नगरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू; थरार CCTV मध्ये कैद

नागपूर : नागपूर शहरातील मनीष नगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या

Bus Accident : चालक ठरला देवदूत! २०० फूट खोल दरीच्या उंबरठ्यावर बस! चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

सिंधुदुर्ग : गोवा-पणजीहून वेंगुर्ल्याकडे येणाऱ्या कदंबा वाहतूक महामंडळाच्या बसचा आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी