CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांदरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृह विभागाला दिले. केंद्राने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर गृह विभागाने गुन्हे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.



'नीट' पेपरफुटीच्या निषेधार्थ देशभरात उठलेल्या असंतोषाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. या आंदोलन काळात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर केला होता, तर आंदोलक विद्यार्थ्यांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.



गृह मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या आंदोलनादरम्यान कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद झालेली नाही. विद्यार्थ्यांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व किरकोळ प्रकरणांमध्ये आंदोलकांना पूर्ण दिलासा दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर आणि यशस्वी जयसवाल एकमेकांना डेट करतायत? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण!

मुंबई: बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील नात्यांची चर्चा नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे.