बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band) आंदोलनादरम्यान सिवान जिल्ह्यात हिंसक घटना घडल्याचे समोर आले आहे. आंदोलनादरम्यान एका पोलिसाने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी सिवान येथील गांधी मैदान परिसरात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि जेपी चौक परिसरात आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यात सिवानचे पोलीस अधीक्षक पी. झा जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. (Student Protest)
फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव? https://prahaar.in/2026/07/27/paach-futaacha-bachchan-the-story-of-the-five-foot-bachchan-a-kirtankars-daughter-is-coming-your-way-soon-the-poster-was-released-ashadhi-ekadashi/ मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ...
त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच दरम्यान विशेष तपास पथकात (SIT) कार्यरत आणि पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेला जवान अभिषेक कुमार पटेल याने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. (Paper Leak)
प्राथमिक चौकशीनंतर बिहार पोलीस मुख्यालयाने संबंधित जवानाला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच त्याच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून गोळीबार कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, तो पोलीस नियमांनुसार होता का आणि त्याची आवश्यकता होती का, याचा तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत. (Bihar Police AK 47)
मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लागल्याची माहिती मिळाली असून, ...
या घटनेत 3 विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या दुखापतींचे नेमके स्वरूप आणि गोळ्या नेमक्या कशामुळे लागल्या, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात असून तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.