मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत.१६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.प्रथमच शालेय वाहतुकीच्या भाडे निर्धारणाचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांकडे (RTO)देण्यात आले असून,पालकांची आर्थिक फसवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : देशांतर्गत सराफा बाजारात आज सकाळच्या सत्रात किंचित घसरण दिसून आली. किमतीतील घसरणीमुळे, देशभरातील बहुतेक सराफा बाजारांमध्ये २४-कॅरेट ...
नव्या नियमांनुसार प्रत्येक शालेय वाहनात सीसीटीव्ही(CCTV),जीपीएस(GPS),सीट बेल्ट,पॅनिक बटण,डिजिटल(DIGITAL) हजेरी प्रणाली आणि व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे.त्यामुळे पालकांना मोबाईल(MOBILE) अॅपद्वारे मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवता येणार आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज ३० दिवस जतन करणे बंधनकारक असेल.वाहनचालक आणि मदतनिसांसाठी पोलिस पडताळणी,वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शारीरिक तंदुरुस्तीची अटही लागू करण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.
नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार असून शालेय वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.