Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत.१६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.प्रथमच शालेय वाहतुकीच्या भाडे निर्धारणाचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांकडे (RTO)देण्यात आले असून,पालकांची आर्थिक फसवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



नव्या नियमांनुसार प्रत्येक शालेय वाहनात सीसीटीव्ही(CCTV),जीपीएस(GPS),सीट बेल्ट,पॅनिक बटण,डिजिटल(DIGITAL) हजेरी प्रणाली आणि व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे.त्यामुळे पालकांना मोबाईल(MOBILE) अॅपद्वारे मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवता येणार आहे.तसेच सीसीटीव्ही फुटेज ३० दिवस जतन करणे बंधनकारक असेल.वाहनचालक आणि मदतनिसांसाठी पोलिस पडताळणी,वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शारीरिक तंदुरुस्तीची अटही लागू करण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.


नव्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार असून शालेय वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.