Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याची चर्चा दिल्लीसह राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.






गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा दिल्लीतील वावर आणि केंद्रीय नेतृत्वाशी होणाऱ्या बैठकांमुळे विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळण्याबाबतचे विरोधी पक्षांकडून सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, या घडामोडींपूर्वी आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत भाष्य केले. (Devendra Fadnavis)





दिल्लीत केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यास काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “जे मिळाले आहे त्यात मी पूर्ण समाधानी आहे. ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी’ या उक्तीप्रमाणे माझे चित्त पूर्णपणे समाधानी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ठरलेला हा दिल्ली दौरा राजकीय पटलावर नव्या समीकरणांना जन्म देईल का, याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (Devendra Fadnavis))

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे