TRAI's MAJOR MOVE : रस्ते अपघातांना ब्रेक लावण्यासाठी 'ट्राय'चा मोठा निर्णय; काय आहे अत्याधुनिक 'V2X' तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत गंभीर चिंता बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच 'ट्राय' (TRAI) द्वारे विकसित केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक 'V2X' (Vehicle-to-Everything) तंत्रज्ञानामुळे येत्या काळात भारतीय रस्ते अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या तंत्रज्ञानाबाबत अलीकडेच एका उच्चस्तरीय सल्लापत्रावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती.




भारतातील रस्ते अपघातांची भीषण आकडेवारी


सरकारी आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अंदाजे ४ लाख ८० हजार रस्ते अपघात होतात. या भीषण अपघातांमध्ये तब्बल १ लाख ७० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, तर ४ लाख ६० हजारांहून अधिक नागरिक गंभीर जखमी होतात. भारतातील बहुतांश रस्ते अपघातांचे मुख्य कारण म्हणजे वाहनांचा अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालवणे. या जीवघेण्या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यासाठीच 'ट्राय'ने V2X तंत्रज्ञानाचा पर्याय पुढे आणला आहे.




V2X तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय?


V2X म्हणजे 'व्हेईकल टू एव्हरीथिंग' (Vehicle-to-Everything) तंत्रज्ञान होय. हे एक असे क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे, जे वाहनांना त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटकाशी जोडते आणि आपापसात संवाद साधण्याची परवानगी देते. यादरम्यान प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रिअल-टाइम माहिती पुरवली जाते.




या तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने चार भाग पडतात:



  1. वाहन ते वाहन (V2V): याद्वारे दोन वाहने कमी पल्ल्याच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधतात. दोन्ही वाहने जवळ असताना संभाव्य टक्कर टाळण्यास यामुळे मदत होते.

  2. वाहन ते वाहतूक सिग्नल (V2I): याच्या माध्यमातून वाहने वाहतूक सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि रस्त्यावरील साइन बोर्ड यांसारख्या पायाभूत सुविधांशी जोडली जातात.

  3. वाहनाकडून पादचाऱ्याला (V2P): रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांशी हे तंत्रज्ञान संवाद साधते. पुढे एखादा पादचारी रस्ता ओलांडत असल्यास, अपघात टाळण्यासाठी वाहन आपोआप ब्रेककस करू शकते.

  4. वाहन-ते-मोबाइल नेटवर्क (V2N): यामुळे वाहने मोबाईल टॉवर्सशी संवाद साधतात, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना देणे, नकाशे अपडेट करणे आणि क्लाउड सेवांचा लाभ घेणे शक्य होते.




हे तंत्रज्ञान कसे काम करते आणि त्याचे फायदे काय?


वाहनांमध्ये उपलब्ध असणारे सेल्युलर, वाय-फाय आणि शॉर्ट-रेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी यांसारखे वायरलेस कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरून हे तंत्रज्ञान कार्य करते. अमेरिकेत गुगलच्या 'वेमो' सारख्या स्वायत्त (Autonomous) गाड्यांमध्ये या तंत्रज्ञाचा यशस्वी वापर केला जात आहे.


या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. यामध्ये वाहतूक कोंडीची माहिती आगाऊ मिळणे, रस्ता बंद असल्याची पूर्वसूचना मिळणे आणि हिवाळ्यात किंवा दाट धुक्यात पुढील वाहनांची अचूक माहिती मिळणे शक्य होईल. तसेच, पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यास मागच्या वाहनाला तातडीने सावध केले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखादी रुग्णवाहिका जवळ येत असल्यास मार्ग मोकळा करण्याचा इशारा या तंत्रज्ञानामुळे चालकाला मिळेल, ज्यामुळे अनेक जीव वाचवणे शक्य होईल. भारतीय रस्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.

Comments
Add Comment

Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर

Nashik News : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाणी विसर्गात वाढ; 94 हजार 497 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

Nashik : नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात पडणार अधिक भर, द्वारका परिसरात होणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच इस्कॉन मंदिर

Nashik : गोदावरीच्या पावन भूमीत आणि प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेचा नवा अध्याय