Diet Tips : Weight Loss साठी तांदूळ खावा की गहू ?

Weight Loss करायचा आहे ? मग काय उत्तम भाकरी, भात की चपाती ? वजन कमी करायला काय करावं ? असा प्रश्न अनेकांना पडतो.


वजन कमी करायचंय म्हणून बरेच जण भात बंद करतात आणि फक्त चपाती (पोळी) खातात. पण हे बरोबर आहे का? भात आणि चपाती दोन्हीत कार्बोहायड्रेट (कर्बोदके) आहेत. फरक फक्त किती आणि कसे खातो यात आहे.



भारतात भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणात खाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. वजन कमी करण्यासाठी भात आणि चपाती यापैकी काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी मतमतांतरे आहेत. कारण तांदुळाचा भात पटकन पचतो, पोट हलकं राहतं, पण जास्त खाल्ला तर calories वाढतात. याच कारणामुळे ब्राऊन राईस किंवा कमी प्रमाणात पांढरा भात खावा असे आहारतज्ज्ञ सांगतात. चपाती अर्थात गव्हाच्या पोळीत Fiber जास्त असतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. गहू + मल्टीग्रेन चपाती weight loss साठी चांगला option पण तेल-तूप लावून 4-5 चपाती खाल्ल्या तर फायदा होणार नाही, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.



भात किंवा चपाती कोणताही पदार्थ पूर्ण बंद करू नका. प्रमाण नियंत्रित ठेवा. आठवड्यातून 3-4 वेळा एका वाटी भात + भरपूर भाजी/डाळ घेऊ शकता आणि चपाती खाताना दोन पेक्षा जास्त नको. यासोबतच डाळी, कडधान्य, भाजी आणि सॅलड यांचाही रोजच्या आहारात समावेश करावा; असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.



दुपारचं जेवण कसं असावं ?


वजन कमी करायचं असल्यास दुपारच्या जेवणामध्ये भाजी, सॅलड आणि प्रोटीन असणे आवश्यक आहे. प्रोटीनमध्ये तुम्ही डाळी कडधान्य यांचा समावेश करू शकता किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन यांचा सुद्धा समावेश करू शकता, असे आहारतज्ज्ञ सुचवतात. जेवणाचं ताट असं असेल तर तुमचं वजन कमी राहील तसेच आरोग्य देखील उत्तम राहील. योग्य प्रमाणात आहार घेतल्यास पोळी आणि भातानेही वजन वाढणार नाही. तुम्ही आहारातून भात आणि पोळी पूर्णपणे कमी केल्यास चिडचिड होणे, मूड स्विंग होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भात आणि पोळी आहारातून पूर्णपणे बंद करू नये. जेवताना शांतपणे प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. टीव्ही वा मोबाईल बघत जेवण घेणे टाळावे.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या