Nashik : नाशिकमध्ये होणार महाराष्ट्रातील पहिल्या 'ईशा ग्रामोत्सव'चे आयोजन; नोंदणी सुरू

Nashik : भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ‘ईशा ग्रामोत्सव’ यंदा महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केला जात असून, त्याची पहिली आवृत्ती नाशिकमध्ये होणार आहे. योगी, आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी २००४ मध्ये सुरू केलेला हा महोत्सव आता देशातील मोठ्या ग्रामीण क्रीडा चळवळींपैकी एक बनला आहे.



राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्था’ म्हणून मान्यता


‘फिट इंडिया’द्वारे प्रमाणित असलेल्या या महोत्सवाला भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्था’ (नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन - एनएसपीओ) म्हणून मान्यता दिली आहे. पायाभूत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी या उपक्रमाला २०१८ मध्ये ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.


यंदा १८ व्या आवृत्तीत प्रवेश करणारा हा महोत्सव महाराष्ट्रासह १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जात आहे. यात ४०,००० हून अधिक गावांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे ८०,००० खेळाडू सहभागी होणार असून, १५,००० महिला खेळाडू आणि ७,००० संघांचा समावेश अपेक्षित आहे. १४ वर्षे व त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि १३ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिला खेळाडूंसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलसह विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. महाराष्ट्रातील गट-स्तरीय सामने १ आणि २ ऑगस्ट रोजी नाशिक येथील ‘कै. मा. साहेब मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम’ येथे होणार आहेत.



महोत्सवात १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे


पुरुषांची व्हॉलीबॉल आणि महिलांची थ्रोबॉल स्पर्धा येथे पार पडेल. विभागीय फेऱ्या १५-१६ ऑगस्ट रोजी ‘सद्गुरू सन्निधी, बेंगळुरू’ येथे, तर अंतिम फेरी ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान कोईम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्र’ येथे भव्य ‘आदियोगी’ यांच्या सान्निध्यात होईल. महोत्सवात १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. अंतिम फेरीतील विजेत्या संघांना ५ लाख रुपये, उपविजेत्यांना ३ लाख रुपये, तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे १ लाख रुपये आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळेल.


पात्र खेळाडूंनी ‘isha.co/gramotsavam’ या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी ‘ग्रॅव्हटन मोटर्स’ (मोबिलिटी पार्टनर), ‘निव्हिया स्पोर्ट्स’ (स्पोर्ट्स अँड इक्विपमेंट पार्टनर), ‘टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ (ब्रॉन्झ पार्टनर), ‘वंडर सिमेंट’ (ऑन-ग्राउंड सपोर्ट पार्टनर) तसेच ‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड’, ‘वरिंदेरा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’, ‘रॉयल इन्फ्राकॉन्स्ट्रू लिमिटेड’ आणि ‘अजिलिसियम कन्सल्टिंग’ (सीएसआर पार्टनर्स) यांचे सहकार्य लाभले आहे.


अधिक माहितीसाठी ‘ishagramotsavam.sadhguru.org’ या वेबसाईटला भेट द्यावी किंवा ८३०००३०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments
Add Comment

Nashik : दारणा धरणातून पाणी विसर्गात वाढ; 19 हजार 312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात

Jalgaon Crime News : सोलर सिस्टीम मंजुरीसाठी मागितली लाच, महावितरणचा अभियंता रंगेहाथ ताब्यात

Jalgaon Crime News : जळगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. सोलर प्रकल्पाच्या रिलीज ऑर्डरसाठी

Commonwealth Games 2026 : उद्घाटनापूर्वीच लव्हलिना बोरगोहेनमुळे भारताचे पहिले पदक निश्चित!

CWG2026 : ग्लास्गो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ (CWG 2026) च्या औपचारिक उद्घाटनापूर्वीच भारताने आपल्या

IND vs ZIM 1st T20I : धोनीचा विक्रम मोडत श्रेयस अय्यरची दमदार एन्ट्री! सलग आठव्यांदा जिंकली नाणेफेक

- भारताने पहिल्या टी-२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्माला

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Heavy Rain : बदलापूर आणि वांगणी परिसरात वादळी वाऱ्याचा आणि मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, वीजपुरवठा खंडित

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि वांगणी परिसराला मागील काही दिवसांपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने